प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना ही भारत सरकारची पारंपरिक कौशल्यधारक कारागीर व हस्तकला व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारी राष्ट्रीय योजना आहे. देशातील विश्वकर्मा समुदायातील परंपरागत 18 व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत, आधुनिक प्रशिक्षण, उपकरणसहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.