जल जीवन मिशन (हर घर जल) ही भारत सरकारची एक प्रमुख फ्लॅगशिप योजना असून 15 ऑगस्ट 2019 पासून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना ग्रामीण विकास, आरोग्य सुधारणा आणि जलसुरक्षा यावर थेट परिणाम करणारी राष्ट्रीय मोहीम आहे.
माडगी ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.